Skip to main content

माझे लेख

 ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान’, शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीकारक चळवळ

सध्या राज्यभरातील शाळांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात येत असुन शाळांचे मुल्यमापण अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेत शाळांना 1 लाखांपासून ते 51 लाखांपर्यंत रोख पारीतोषीके मिळणार असल्याने सर्व शाळा उत्स्फुर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. शाळाशाळांमध्ये स्पर्धा लावून शाळांचा विकास करण्याची कल्पना निष्चितच कौतुकास्पद आहे.
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आदर्ष शाळा योजनेअंतर्गत मागील वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान पहिल्यांदाच संपु राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात आले. यात राज्यातील 95 टक्के शाळांतील 2 कोटी विद्यार्ह्यांनी  सहभाग घेतलेला होता. महावाचन प्रकल्पाची तर गीनीज बुक मध्ये नोंदणी  करण्यात आली. स्वच्छता दुत उपक्रम, बोलक्या भिंती करणे, शाळा व्यवस्थापणांद्वारे राबविलेले प्रभावी उपक्रम, कचरा व्यवस्थापन, हॅन्डवाॅश , लोकवर्गणीतून संगणक साक्षरता या उपक्रमांची जवळपास सर्व शाळांनी प्रभावी अंमलबजावणी केली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी लागणारा सर्व खर्च शाळांनी व शिक्षकांनी  स्वतःहून केला.
यावर्शी ऑगस्ट  महिन्यात परत एकदा शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविण्याचा निर्णय घेतला. बक्षिसादाखल मिळणारी मोठी रक्कम तसेच तालुक्यात,जिल्ह्यात  आपल्या शाळांचे नाव उज्वल करण्यासाठी राज्यातील सर्व शाळा परत एकदा कामाला लागल्या. मात्र यावर्षी  निवडीचे निकष बदलल्याने शाळांना कार्यालयीन कामे ते डीजिटल शिक्षण  व वृक्षारोपण ते दिव्यांग विद्यार्थी धोरण व क्रिडा क्षेत्र ते सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे आवश्यक  झाले आहेत. त्यामुळे यावर्शी शाळांना स्पर्धेसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम राबवितांना शासनाने अनेक बारीक सारीक गोष्टींचा  विचार केल्याने या उपक्रमाचे उद्दिश्ठ साध्य करणे सोपे झाले आहे. स्थानिक व्यवस्थापनाच्या शाळा, खाजगी शाळा, शहरी शाळा असे वेगवेगळे गट केल्याने सर्व शाळांना समतुल्य शाळांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. कारण खाजगी शाळा व जिल्हा परिशदेच्या शाळांची तुलना केल्या सर्व बाबतीत खाजगी शाळा सरस ठरत असल्याचे चित्र आहे. तसेच एकदा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पुढल्या टप्प्यात शाळांना समोरच्या स्तरावर स्पर्धा करावी लागणार असल्याने शाळांना जास्त मेहनत करावी लागणार आहेत व नवीन शाळांना पुरस्काराची संधी प्राप्त होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र SSC दहावीचा निकाल उद्या, 13 मे रोजी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे की दहावीचा निकाल उद्या, मंगळवार (ता. 13 मे) रोजी दुपारी 1 वाजता घोषित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची घोषणा असून निकाल पाहण्यासाठी विविध अधिकृत वेबसाइट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? विद्यार्थी आणि पालक ऑनलाइन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून सहज निकाल पाहू शकतात. यासाठी खालील अधिकृत वेबसाइट्सवर भेट देऊ शकता: www.mahahsscboard.in www.mahresult.nic.in www.msbshse.co.in www.mh-ssc.ac.in www.sscboardpune.in निकाल पाहण्याची पद्धत: वरीलपैकी कोणत्याही वेबसाइटवर जा. 1. तुमचा सीट नंबर टाका. 2. तुमच्या आईचे नाव भरा. 3. निकाल स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही तो डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता. विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना अचूक माहिती भरावी आणि अधिकृत वेबसाइट्सवरच विश्वास ठेवावा, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील उत्तम दर्जाच्या काम करणा-या आयडॉल शिक्षकांची व शैक्षणिक संस्था निवडीसाठी समित्या स्थापन करणार

राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील प्रत्येक मुलांस गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या शाळा चालविल्या जातात. काही शाळा शासनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन द्वारे शाळा चालविल्या जातात. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील शाळांमधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणा-या शिक्षकांना त्यांच्या दर्जेदार कामाबद्दल प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे योग्य राहील. तसेच राज्यात २१ व्या शतकातील नविन आव्हाने व शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी राज्य शासन, विविध योजना कार्यान्वित करीत आहे. या योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागत आहे. ...

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी

  राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत रामटेक तालुका अग्रस्थानी देवलापार - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे द्वारा आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा जिल्हास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रामटेक तालुक्याला सर्वाधिक चार पुरस्कार प्राप्त झाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे सोमवारी बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांचे द्वारा बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हास्तरीय प्राथमिक गटामध्ये स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक केतन कामडी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला तर जिल्हा परिषद शाळा खुमारी येथील शिक्षिका अंजली गणवीर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.  तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये  स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार येथील शिक्षक सुनील वेळेकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर उल्हास ईटनकर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. शिक्षकामधील उपक्रमशीलता वाढीस लागावी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या नवोपक्रम उपयुक्त ठरावे यासा...