Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

राज्यातील शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी; १६ जूनपासून नववर्षाला सुरुवात

महाराष्ट्रातील सर्व शासकीय, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मे २०२५ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने २९ एप्रिल रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ला १६ जून २०२५ पासून सुरुवात होणार आहे. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व शाळांना सुट्टी आणि नवीन वर्षाच्या आरंभासाठी एकसंध वेळापत्रक आखण्यात आले आहे. इतर शिक्षण मंडळांतील शाळांनीही १६ जूनपासूनच अध्यापन सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाचे मुद्दे: 1. विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टी २ मे २०२५ पासून लागू होईल. 2. इतर मंडळांतर्गत शाळा परीक्षा किंवा अन्य कारणांमुळे वेगळी वेळापत्रक ठेवू शकतात, मात्र त्यासाठी स्थानिक प्रशासनाची मान्यता आवश्यक आहे. 3. नवीन शैक्षणिक वर्ष १६ जून २०२५ पासून सुरू होईल. 4. जून महिन्यातील उष्णतेची तीव्रता लक्षात घेता, २३ ते २८ जून या कालावधीत शाळा सकाळी ७.०० ते ११.४५ पर्यंतच भरवाव्यात. ३० जून २०२५ पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील. शाळांनी या वेळापत्रकाचे पालन करावे व विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्य...

राज्यातील उत्तम दर्जाच्या काम करणा-या आयडॉल शिक्षकांची व शैक्षणिक संस्था निवडीसाठी समित्या स्थापन करणार

राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार व गुणवत्ता पुर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. याकरीता राज्यात विविध प्रकारचे उपक्रम व धोरणांची अंमलबजावणी केली जाते. राज्यातील प्रत्येक मुलांस गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या शाळा चालविल्या जातात. काही शाळा शासनाद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापन द्वारे शाळा चालविल्या जातात. दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासाकरीता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील शाळांमधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणा-या शिक्षकांना त्यांच्या दर्जेदार कामाबद्दल प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे योग्य राहील. तसेच राज्यात २१ व्या शतकातील नविन आव्हाने व शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी राज्य शासन, विविध योजना कार्यान्वित करीत आहे. या योजनांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागत आहे. ...